भान

 

आजूबाजूला बघतांना कळतं;

खंबीर बनायचंच असतं,

थोडं अवघड असतांनाही सगळं छानंच असतं

 

मृदू , कोमल ,हळूवार ;

मन जपायला शिकलेलंच असतं,

कारण आधीचं गिरमिटलेलं सगळं पुसायचं पण असतं

 

मेहनत, काम , कष्ट ;

गरजेला सगळं करायचंच असतं,

पण स्वप्न पाहातांना मात्र दिवस न् रात्रीचं गणितंच नसतं

 

धटाशी धट आणि खटाशी खट ,

 जगराहाटीला धरून वागायचं असतं,

स्वतःसाठी  मात्र स्वतःच ताठ कण्याने उभं रहायचंही असतं

 

चुकलं की सुधरवायचं असतं;

हरलं की पुन्हा नव्याने खेळायचं असतं,

कुठेतरी कधीतरी विश्वास ठेवून बघायचंही असतं

 

प्रयत्नात कमी पडायचंच नसतं;

हरवलेलं शोधायचही नसतं,

पण पुन्हापुन्हा गमावेल असं काही करायचंही नसतं

 

विचार करून, मनाशी बोलून

शहाण्यासारखं वागायचं असतं;

पण तरीही प्रत्येकक्षण जगणं सोडायचंही नसतं

 

मनापासून जगण्याचं भान कधी सोडायचंच नसतं….

 

-श्रुतकिर्ती

२७/१०/२०२३


Comments

  1. Very crucial point , very hard to follow — मनापासून जगण्याचं भान कधी सोडायचंच नसतं….

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!